Posts

Showing posts from April, 2026

बदली झालेल्या पोलीस अधीक्षकांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या..सातारा जिल्हा शिवसेनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार

Image
  सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलिस प्रमुख तुषार दोषी यांची सांगली जिल्ह्यात तडकाफडकी बदली झाली मात्र बदली झालेच्या दिवशीच संबंधित पोलिस प्रमुखांनी आपल्या अधिकारात जिल्ह्यातील सहा ते सात पोलिस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्या.या नियमबाह्य बदल्याबाबत सातारा जिल्हा शिवसेना राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदन देऊन राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल दाखल केली  आहे.  निवेदनात पुढे म्हटले आहे की,  सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीपासून सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून यासंदर्भात राज्याच्या विधिमंडळात ही त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत.एवढेच नव्हे तर या घटनेचे संपूर्ण  राज्यसहित देशात चर्चा झाली.त्यामुळे राज्य सरकारने तुषार दोषी यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर ही पाठविले होते.   अशा या वादग्रस्त पोलीस अधीक्षकांची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन  संबंधित अधीक्षकांची सातारा येथून सांगली जिल्ह्यात तडकाफडकी बदली केली.मात्र या अधीक्षकांनी स्वतःची बदली झाली असताना आपल्या अधिकाराचा...

यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची आदर्श कामगिरी शेतकऱ्यांना ३ हजार एवढा उच्च दर देत पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी लोकनेत्यांचा वारसा जपणारे कार्यक्षम युवा नेतृत्व म्हणून यशराज देसाईंचे सहकार व कृषी क्षेत्रातून कौतुक

Image
  सातारा (१५ एप्रिल २०२६) : पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगात स्पर्धा तीव्र असताना, मर्यादित उत्पादन क्षमता असूनही शेतकऱ्यांना सर्वोच्च दर देत पाटण तालुक्यातील मरळी-दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चेअरमन यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सरस कामगिरी केली असून शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी ऊस दर वर्ग करणारा सातारा जिल्ह्यातील हा दुसरा कारखाना ठरला आहे.   लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन असतानाही, पहिल्याच उचलीत ३ हजार रुपयांची रक्कम देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एफआरपी देण्यासाठी कोणतेही कर्ज न उभारता १०० टक्के रक्कम थेट शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे केवळ १,९५,००० मेट्रिक टन गाळप झाले होते. तरीही पूर्ण एफआरपी वेळेत जमा करण्यात आली. डोंगराळ, दुर्गम भागातील कमी गाळप क्षमतेचा कारखाना असूनही इतर मोठ्या कारखान्यांप्रमाणे स्पर्धात्मक दर देण्यात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना यशस्वी ठरला आहे....

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 43 व्या पुण्यतिथीनिमित्त २० एप्रिलपासून दौलतनगरला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.

Image
  दौलतनगर दि .13:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 43 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दौलतनगर , ता . पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे आयोजन सोम वार दि . २० एप्रिल ते गुरुवार दि . २३ एप्रिल , २०२ 6 पर्यंत कारखाना कार्यस्थळ दौलतनगर ता . पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह तसेच पाटण तालुका वारकरी संघाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे . लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते . सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो. यंदाच्या वर्षी दि . २३ एप्रिल , २०२ 6 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 43 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि . २० ते २३ एप्रिल , २०२ 6 पर्यंत तीन दिवसीय श्र...