लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. चेअरमन मा.यशराज देसाई(दादा). लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

 



दौलतनगर दि.17:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्ये चांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचे दुसऱ्या टप्पयातील विस्तारवाढ सुरु असून यंदाचे गळीत हंगामापूर्वी हे काम पूर्ण करत आहोत. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण केला होता. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे. नियोजनबध्द काम करुन सन 2023-24 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी केले.

                दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2023-24 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन  कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी अशोकराव पाटील,सोमनाथ खामकर,प्रशांत पाटील,शशिकांत निकम,बबनराव शिंदे,सुनील पानस्कर,शंकरराव पाटील,विजय सरगडे,सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर,कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                 यावेळी बोलताना चेअरमन यशराज देसाई (दादा)  पुढे म्हणाले,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत आपले उद्योग समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली आपला कारखाना उत्तरोत्तर चांगली प्रगती करत आहे.सभासद शेतकऱ्यांचे ऊसाला योग्य दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जिवनमान उंचवावे हे लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्न आपल्या उद्योग समुहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये 2,16,982 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन  सरासरी 12.07 % साखर उताऱ्याने 2,61,790 क्विंटल साखर उत्पादन केले असून, आपण कारखान्याच्या विस्तारवाढीच्या दुसऱ्या टप्प्याचे कामास सुरुवात केली असून यंदाच्या गळीत हंगामापूर्वी  दुसऱ्या टप्प्यातील विस्तारवाढीचे  काम पूर्ण होत आहे.तसेच कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाकरीता यंत्रसामग्री देखभाल,दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियेाजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.त्याचबरोबर गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यामध्ये यंदाच्या वर्षी वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही ते म्हणाले. गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिलमधील रोलरचे आज पूजन होत आहे.प्रतिवर्षी कारखाना गळीत हंगामामध्ये आलेल्या अडचणींवर मात करीत, यशस्वी गळीत  करण्याची आपल्या कारखान्याची परंपरा यापुढेही अशीच ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम करावे.आपला हा कारखाना सभादांचा हक्काचा कारखाना असल्याने कारखाना चालविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करुन  ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना एफआरपीच्या धोरणानुसार ऊस दर देण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे.आज जरी सहकारी साखर कारखानदारीपुढे अनेक संकटे असले तरी ऊस उत्पादक सभासद,शेतकरी,ऊस तोडणी मजूर,कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे सांघिक प्रयत्नातून या संकटांना सामोरे जाऊन त्यावर मात करत येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी  सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनबध्द काम करावे.तसेच आपले कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला गळीतास देऊन येणार गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

 


Comments

Popular posts from this blog

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 151 गावातील 297 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी

रविराज देसाई यांचा दि.12 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम स्थगित वाढदिवसादिवशी परगावी जाणार.

ऊस गळीत हंगाम सन२०२४/२५ साठी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ